प्रिय ऍलन,
तुम्हाला खरंच तसदी द्यावी का असा विचार माझ्या मनात येत होता. तरीसुध्दा मुद्याची बाब ही पूर्णपणे प्रशस्तीपर असल्याने मी पुढचं पाऊल टाकायचा निर्णय घेतला. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेला समारंभ हा खरोखरच मी जगात कुठे पाहिला नसेल इतका उत्कृष्ट होता. माझ्यासारख्या - माझे वर्णन मी अंतिम उपभोक्ता करेन - प्रेक्षकाच्या दृष्टीने हा समारंभ नेमका कसा संपन्न झाला, हे सांगायलाच पाहिजे. त्यामुळेच मी तुमचा थोडासा वेळ घेतो :
- समारंभाच्या आदल्या दिवशी तुमचे एक शाखा व्यवस्थापक श्री नायर - 0330 - स्वत: माझ्या घरी आले आणि त्यांनी तुमची आमंत्रणपत्रिका मला देऊन समारंभाला मनापासून आमंत्रित केले. प्रत्यक्ष शाखा प्रमुखाने इतक्या मन:पूर्वक आमंत्रित करण्याची कल्पना मला कौतुकास्पद वाटली. अर्थात मला ती स्वीकारावीच लागली.
- मी कारने बाल शिक्षण मंदिरातल्या कार पार्केंगपाशी पोचलो तेव्हा तिथे मार्गदर्शक प्रत्येक कारच्या स्वागतासाठी आणि पार्केंग योग्य त्या ठिकाणी व्हावे म्हणून उभे होते. पार्केंग झाल्यावर पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी थांबलेल्या गाडीपाशी आम्हाला नेले. तिथे डखायव्हरने कारचे दार उघडले आणि आमचे सुखद स्वागत केले. पार्किंगपासून समारंभस्थळी घेऊन जाणारी गाडी सोडण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तिथे एक व्यक्ती सजज होती. सभागृहात मोबाईल घेऊन जाता येणार नाहीत अशीही सूचना संबंधित व्यक्तीने केली.
- बँकेने भाडय़ाने दिमतीला घेतलेली गाडी आम्हाला सभागृहाच्या आवाराच्या गेटपाशी घेऊन गेली. त्या ठिकाणी असलेल्या पोलीसांची (ते तुमच्या नियंत्रणाखाली नव्हते ) वागणूक अपवादात्मकरित्या सौजन्यपूर्वक पण शिस्तीची होती, त्यांनी आम्हाला शारिरिक कुचंबणा करावी लागत असल्याबद्दल दिलगिरी पुन्हापुन्हा व्यक्त करत आमची तपासणी केली. पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक जातीने प्रवेशव्दारापाशी आमच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
- एकदा आत गेल्यावर आपल्या कर्मचा-यांनी निर्माण केलेले वातावरण आश्चर्यकारक वाटावे इतके आरामदायी होते. तुमच्या कर्मचा-यांपैकी एका स्त्री कर्मचा-याने आमचे वय किंवा पोशाखाचा प्रकार असे काही भेदभाव न करता आम्हाला आमच्या सीटपाशी नेले. o तुम्ही स्वत: आणि कार्यकारी संचालकांनी केलेले स्वागत आणि त्यानंतरची भाषणे ही एक सुखद पर्वणी वाटली.
- सूत्रसंचालक व्यक्तीही उत्तमरित्या प्रशिक्षित होती आणि संभाषण ओघवते आणि अचूक होते. इलेक्टॉनिक व्यवस्था आणि ध्वनीयंत्रणाही निर्दोष, बिनचूक होती. अगदी सत्यम किंवा इन्फोसिसच्या कार्यकऎमांपेक्षाही उत्तम वाटावी असेच समारंभाचे सादरीकरण होते.
- त्यानंतर मा. राष्टखपती सभागृहात प्रवेश करुन थेट रंगमंचावर जाताना आम्ही पाहिले.
- शेवटी आपल्यापैकी कोणाच्याच भाषणात स्तुतीपाठकत्व नव्हते आणि एकूणच समारंभ खूपच माहितीपूर्ण, थेट असा झाला.
- बाहेर पडताना आम्हाला एक सुंदर भेट देण्यात आली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
आपल्याला हे अमृतमहोत्सवी वर्ष अतिशय आनंदाचे, यशस्वी जावो हीच प्रार्थना.
बिऎ. घारपुरे |